Ad will apear here
Next
बस आणि ट्रक आता चालणार विजेच्या तारेवर..
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने केंद्र सरकारचे नवे पाऊल..
रस्त्यावरील वाहतुकीमध्ये सर्वांत जास्त अडसर होतो तो जड आणि मोठ्या वाहनांचा. यांतही विशेषत: ट्रक आणि बस यांच्यामुळे वाहतूक रहदारी वाढण्याचे प्रमाण अधिक आहे. असे असताना या बसेस आणि ट्रक रस्त्यांवरून गायब करता आल्या तर?  हे कसे शक्य आहे, असे तुम्हाला नक्कीच वाटले असेल. परंतु हे शक्य करण्यासाठी विजेच्या तारेवर चालणाऱ्या बस आणि ट्रक सुरू करण्याचा विचार केंद्र सरकार करत असून, त्या दृष्टीने अभ्यास सुरू करण्यात आला आहे. 

नितीन गडकरी (संग्रहित छायाचित्र)आत्तापर्यंत आपण केवळ रस्त्यांवरून धावणाऱ्या बस आणि ट्रक पाहात आलो आहोत. परंतु येत्या काही काळात रेल्वेप्रमाणे बस, ट्रकही विजेच्या तारांवर धावताना दिसल्या, तर आश्चर्य वाटायला नको.. हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण कमी करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या बस आणि ट्रक सुरू करण्याबद्दल केंद्र सरकार विचार करत असल्याचे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. 

अशी आहे योजना – 
सध्या केवळ रेल्वे आणि इलेक्ट्रिक ट्रॉलीज विजेवर चालतात. आता विजेवर चालणाऱ्या बस आणि ट्रक या प्रस्तावावर केंद्र सरकार विचार करत असून, प्रायोगिक तत्त्वावर मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस हाय-वेवर या बस आणि ट्रक चालविण्यात येणार आहेत. नवी दिल्ली-मुंबई दरम्यान तयार करण्यात आलेल्या नवीन एक्स्प्रेस हाय वेवर दोन्ही बाजूंच्या शेवटच्या रस्ता-लाइनवर या इलेक्ट्रिक लाइन टाकण्यात येणार आहेत. या प्रयोगावर काम करून तो किती अंशी यशस्वी होईल हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. त्यादृष्टीने या प्रस्तावाचा अभ्यास करण्यात येत आहे. 

मार्ग सुरू झाल्यानंतर त्यावरून बसेसबरोबरच ट्रकही विजेवर धावू शकतील. या बस एकत्र जोडलेल्या असतील. या नवीन एक्स्प्रेस हाय-वेवरून धावताना दिल्ली – जयपूर – अलवर – सवाई माधोपूर – वडोदरा  असा त्यांचा मार्ग असेल. हा प्रयोग यशस्वी झाला, तर यामुळे वाहतुकीचा खोळंबाही कमी होईल, इंधनबचत होईल, शिवाय देशातील प्रदूषण कमी होण्यासही हातभार लागेल.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZQZBQ
Similar Posts
राजनाथसिंह नवे संरक्षणमंत्री; अमित शहांकडे गृहखाते; खातेवाटप जाहीर नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी ३० मे २०१९ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. राष्ट्रपतिभवनात झालेल्या शानदार सोहळ्यात त्यांच्यासह एकूण ५८ मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मंत्रिमंडळाचे खातेवाटप ३१ मे २०१९ रोजी जाहीर झाले आहे. राजनाथसिंह यांच्याकडे
‘उच्च शिक्षणासाठी सामाजिक संस्थांचा हातभार महत्त्वाचा’ पुणे : ‘शेतीविषयक शिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण बदल केले जात आहेत. सरकारनेही चांगल्या योजना निर्माण केल्या आहेत. शिवाय, आपल्याकडे बहुतांश विद्यार्थी मुख्य व्यवसाय शेती असलेल्या भागातून येतात. मात्र, आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येतात. अशावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या
आंतरराष्ट्रीय विज्ञानपट महोत्सवात पुणेकर ‘कस्तुरी’च्या यशाचा दरवळ पुणे : दहावीत शिकणाऱ्या कस्तुरी कुलकर्णीने बनवलेल्या ‘सिंबायोसिस’ या लघुपटाला ‘इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला आहे. कस्तुरी ‘बेरीज वजाबाकी’ या मराठी चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शकसुद्धा आहे.
१७व्या लोकसभेत विक्रमी ७८ महिला खासदार नवी दिल्ली : राजकारणात महिलांचा टक्का वाढताना दिसत असून, नुकत्याच झालेल्या १७व्या लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल ७२४ महिला उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते; त्यापैकी ७८ जणींना खासदारपदाची संधी मिळाली आहे. लोकसभेतील महिला खासदारांची ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. त्यापैकी ४१ महिलांनी या आधीही खासदारपदाची जबाबदारी सांभाळली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language